सोलापूर : यंदा गणेश विसर्जनसाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत नेटके असे नियोजन केले आहे. जल प्रदूषण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने अतिशय चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले.
विजापूर रोडवरील संभाजी तलावात सुद्धा रस्त्याच्या बाजूने असलेल्या भागात पोलीस व महानगरपालिकेने मूर्ती संकलनाची योग्य पद्धतीने सोय केली आहे. महापालिकेने ठेवलेल्या पाण्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करून त्या मुर्त्या संकलित केल्या जात आहेत परंतु पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची नजर चुकून कंबर तलाव च्या रेल्वे रुळाच्या बाजूने असलेल्या धोबी घाटाकडे मोठ्या प्रमाणात घरगुती विसर्जन पाण्यात खोलवर जाऊन मुर्त्या बुडवल्या जात आहेत.
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या भागात रेल्वे गाड्या मोठ्या प्रमाणात येत असतात तिकडे नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्या बाजूच्या होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण आणून पाण्यात होणारे विसर्जन रोखावे.