अभियंत्यांनी ठरवलं तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू ; विनाकारण आमच्यावर अन्याय नको ; असे काय घडले झेडपीत
सोलापूर : राज्य अभियंता संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन अभियंता मयूर पिंगळे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यात आली.
मागील काही दिवसापूर्वी अर्थ विभागातील एका कनिष्ठ लेखाधिकारी सोबत मयूर पिंगळे यांचा बिलावरून वाद झाला होता. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ अर्थ विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले होते आणि सीईओ यांना निवेदन देऊन संबंधित अभियंता पिंगळे यांना टाळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.
दरम्यान शुक्रवारी लगेच राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अभियंत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले आणि घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर अध्यक्ष भोसले यांनी अर्थ विभागातील कामगारांच्या कारभारावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक बिला पाठीमागे कर्मचारी टक्केवारी मागतात असा आरोप करत अभियंत्यांनी ठरवले तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.
तर पिंगळे यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना अर्थ विभागाच्या कारभाराचा पोलखोल केली.
यावेळी योगेश भांड, सतीश मोटे, एजाज पठाण, शिवराज निंबाळकर, अनिल देशमुख, नवनाथ भिसे, राजेंद्र मोठे, संतोष शेंडगे, ओंकार पांढरे, तनवीर पठाण, संजय माने, किशोर चव्हाण, वैभव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, अतुल सुरवसे, विकी तिकुटे, निखिल जाधव, सौरभ मगर, मेघराज चव्हाण, जयवंत सूळ, बापूराव वाघमोडे, दीपक जानकर, शाहिद शेख यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.