विठ्ठला..पांडुरंगा महायुती सरकारला सुबुद्धी दे! काँग्रेसचे सतेज पाटील, राजू शेट्टी, प्रणिती शिंदेंचे साकडे
पंढरपूर : गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वााभिमानी माजी मंत्री सतेज पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, खासदार प्रणिती शिंदे, यांच्यासह इतर नेतेमंडळीनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ विठ्ठल मुर्तीला साकडे घातले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शक्तिपीठ महामार्गातील बाधित 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामिल झाले.