सोलापूर : काँग्रेस पक्षाने नुकतंच शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी एका कार्यकर्त्याला संधी दिली. पक्षाची ती निवड योग्य होती कारण तो चेहरा, सर्वसमावेशक तर आहेच परंतु मुस्लिम भागातील त्यांना राजकिय किंगमेकर समजले जाते. मोठी मतं वळवण्याची ताकद त्या माणसाकडे आहे. ती व्यक्ती म्हणजे श्रीशैल रणधिरे सर.
नई जिंदगी, सहारा नगर हा भाग मुस्लिम समाजाचा बहुल भाग समजला जातो. पण या भागात पंचशील प्रशाला आहे. त्या प्रशालेच्या परिसरात रणधिरे परिवाराला कुणी ओळखणार नाही असे होऊच शकत नाही. श्रीशैल रणधिरे यांना त्या भागात ‘दादा’ म्हटले जाते.
हा दादा तसा कुणाला त्रास देणारा नाही, तर प्रेमळ, दिलखुलास, दिलदार आहे. स्वतःच्या खिशातून दुसऱ्यावर खर्च करणारा व्यक्ती आहे. त्यांच्या मित्र परिवार प्रचंड आहे, हीच त्यांची ओळख झाली आहे. तसेच यांची काय ताकद आहे हे या भागातील मुस्लिम समाजातील नेतेही जाणून आहेत.
रणधिरे कुटुंबाची ओळख ही त्यांचे वडील दलितमित्र नागनाथ कृष्णा रणधिरे यांच्यापासून. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जायचे. 1980 साली नागनाथ रणधिरे यांनी या भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था काढली त्या माध्यमातून आंबेडकर नगर, गजानन नगर, रमामाई आंबेडकर नगर तीन वसाहती निर्माण करून त्या भागातील गोरगरीब जनतेसाठी हप्त्याने घरे मिळवून दिली.
1985 साली मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्रशाला सुरू केली. तसेच 1995 मध्ये ज्ञानगंगा प्रशाला सुरू करून हजारों विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली.
2011 साली नागनाथ रणधिरे यांचे निधन झाले. वडिलांचे सर्व समावेशक गुण श्रीशैल यांच्यात आहेत, आपल्याकडे आलेला व्यक्ती कुणीही रिकाम्या हाती परत गेला नाही. हे नागनाथ रणधिरे यांचे वैशिष्ट्य होते, ते श्रीशैल यांनी कायम ठेवले आहे.
काँग्रेस पक्षाने दिलेली सरचिटणीस पदावरील संधीचे सोने करण्याची त्यांची इच्छा आहे. आपल्या भागातील कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याचाही फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला होणार आहे. सहारा नगर, अमन चौक, गजानन नगर, आंबेडकर नगर या नई जिंदगीच्या पूर्ण भागात काँग्रेस पक्षाची कमी झालेली ताकद आता पुन्हा पक्षाला उर्जितावस्था आणण्याचे काम रणधिरे यांना करावे लागणार आहे.























