राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना ताणले ! अकलूजमध्ये भाजपला 10 हजार मते ; चौघांनी रोवला भाजपचा झेंडा
दोन दिवसांपूर्वी लागलेल्या नगरपालिकेच्या निकालामध्ये अनेकांच्या नजरा या माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेकडे होत्या. या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांनी अकलूज नगरपालिकेत शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहिते पाटील गटाला जोरदार आव्हान दिले होते.
या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी मोहिते पाटलांच्या अकलूज बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीने तब्बल दहा हजार मते घेतले आहेत. भाजपचे चार नगरसेवक निवडून आले असून सात नगरसेवक किमान 50 चा फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे अकलूज मध्ये सुद्धा आता भारतीय जनता पार्टी आपले पाय भक्कम रोवत असल्याचे सिद्ध होत आहे.
या निकालानंतर राम सातपुते यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल झाल्या आहेत की,
अकलूज नगरपरिषद निवडणूक म्हणजे केवळ एक स्थानिक निवडणूक नव्हती. ती ७० वर्षांपासून चालत आलेल्या राजकीय सत्तेला थेट आव्हान देणारी लढाई होती. मोहिते पाटील यांची सत्ता,दहशत अशी होती गेल्या अनेक वर्षात इतर पक्षांनी तिथे प्रवेश करण्याचाही विचार केला नव्हता
एक काळ असा होता की अकलूजमध्ये भाजपला साधा बूथप्रमुख मिळणेही अवघड होते. कार्यकर्त्यांवर दबाव, भीतीचे वातावरण आणि सत्तेचा वापर करून विरोधकांना दडपण्याची परंपरा होती.
अश्या परिस्थिती मधे भारतीय जनता पार्टीने मा.आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला.
एका बाजूला पैसा,७० वर्षाची मक्तेदारी,दहशद,दबाव तर दुसरी कडे रामभाऊ सातपुते यांच नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही निवडणूक होती.
स्वतःला राज्याचे पुढारी समजणारे सगळे नेतेमंडळी त्यांचं कुटुंब अकलूज गल्लीबोळात फिरत होत.
जिथ भारतीय जनता पार्टी अत्यल्प प्रमाणात होती तिथं
• भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जवळपास १०,००० मते मिळली
• ४ नगरसेवक भाजपचे निवडून आले
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकलूज मधील जनतेमधे दहशतीच वातावरण संपल हाच मोठा विजय आहे .
अकलूजमध्ये आज भाजपने सत्ता मिळवली नसेल, पण भविष्यासाठी मजबूत पायाभरणी नक्कीच केली आहे. ७० वर्षांच्या सत्तेच्या विरोधात उभं राहणं आणि दहा हजार मतांपर्यंत मजल मारणं,४ नगरसेवक निवडून आणणे हे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाची ताकद आहे.
आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच पराभूत होत नसतो तो त्या निवडणुकीतून शिकत असतो पुढं चालत असतो.संघर्ष करत असतो.
“क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं,संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही।




















