आम्हाला हवाय देवेंद्र भाऊच ! ४८ मतदारसंघात १२५ सभा, महाराष्ट्रात फडणवीसांचाच बोलबाला?
सध्या सोशल मिडीयावर एक गोष्ट प्रचंड व्हायरल होतीये. ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची यादी. आयपीएल आणि लोकसभा निवडणूकीच्या मौसमात फडणवीसांनी सभांचा जोरदार स्ट्राईकरेट सुरु ठेवला आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. ५ टप्प्यात तिथं मतदान होतंय. पहिल्या टप्प्याचं मतदान पुर्व विदर्भात होईल. ते १९ एप्रिला पार पडेल. १५ एप्रिलपर्यंत फडणवीसांनी १६ सभा घेतल्या. हा वेग पाहता फडणवीस येत्या काळात १२५ हून अधिक सभा घेवू शकतात. असा कयास बांधला जातोय.
केंद्रिय नेत्यांची सभांसाठीची मोठी मागणी या निवडणूकीत असते. कारण मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरते. त्यामुळे मोदी- शहा जोडींपैकी एकाची सभा उमेदवारांना हवी असते. अशात योगी आदित्यनाथांनीही राष्ट्रीय स्तरावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाला जोरदार मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते. पुर्व विदर्भात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिलला आहे. १५ एप्रिलपर्यंत फडणवीसांनी १६ सभा घेतल्या आहेत. प्रचाराला अजून दोन दिवसांचा वेळ आहे. या सभांची भर पडू शकते. त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकुण स्ट्राईकरेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीचा आहे. म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात २० सभा घेतल्या तरी त्यांच्या सभा हा १०० चा आकडा आरामात गाठू शकतात. कार्यकर्त्यांना मात्र १२५ ते १३० सभा फडणवीसांकडून हव्या आहेत.
मास लिडरची प्रतिमा
फडणवीसांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता दर्शवतीये. फडणवीस मास लिडर झाल्याची ही पवाती असल्याचं बोललं जातंय. फडणवीसांचा जातींचा उल्लेख ही पवारांनी केला होता. यामुळं त्यांच्यामागे संख्याबळ नसल्याचं, मास लिडर होण्याची ताकद नसल्यांच सांगण्यात येत होतं. फडणवीसांनी मात्र हे नरेटिव्ह पुरतं खोडून काढलंय. फडणवीसांच्या सभा भाजपसोबत सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटालाही हव्या आहेत. हे शक्य झालंय फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला. दोन्ही समाजाचा असंतोष सामंज्यस्यात बदलला. पुढं मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळं दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असं केलं. दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले. त्यातूनही योग्य मार्ग काढले. फडणवीसांचं हेच सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्रं आहे. राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याच प्रयत्न फडणवीसां केला होता. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सरकारात्मक भावना तयार झाली आहे. त्याचं मतात रुपांतर करण्यासाठी फडणवीसांच्या सभा महत्त्वाच्या आहेत. असं मत महायुतीचे नेते व्यक्त करतायेत. त्यामुळं फडणवीसांची प्रतिमा मास लिडर बनल्याचं बोललं जातंय.
मविआला टक्कर
यंदाची निवडणूक मविआ विरुद्ध महायुती असं असल्याचं चित्रंय. वास्तवार मात्र पवार आणि फडणवीसांमध्ये तीव्र संघर्ष आहे. परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं. यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवलं. जानकरांना आपल्याकडे खेचलं. अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमदेवारी मिळवून दिली. इथं फडणवीसांनी पवारांना शह दिला. लगचेच पवारांनी उलटा डाव टाकला. माढ्यात मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं. पवारांनी फडणवीसांच्या खेळीची परतफेड केल्याचं बोललं गेलं. दोघांमध्ये संघर्ष सुरु असताना ठाकरे मात्र फारसे अॅक्टिव्ह दिसत नाहीयेत. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत ही नाराजीनाट्य रंगतं आहे. मात्र ही नाराजी सोडवण्यासाठी सर्वांना ‘सागर बंगला’च महत्त्वाचा वाटतो आहे. फडणवीसांच्या या निवासस्थानी चर्चेच्या अनेक मालिका पार पडतायेत. दिवसभर सभा आणि संध्याकाळी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ फडणवीसांवर आलीये. महायुतीत जागा वाटपावरुन गोंधळ आहे. मात्र, कोणत्याही नेत्याने टोकाची भूमिका घेतली नाही. सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस शिवसेना भिडते आहे. मुंबईचंही चित्र तसंच आहे. हे घडत असताना महायुतीत शिस्त राखण्यासाठी फडणवीस यशस्वी ठरल्याचं चित्र आहे.