जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा झाला बालस्नेही पुरस्काराने सन्मान ; शानदार सोहळा
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग यांचे वतीने दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार सोमवारी राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड.सुशीबेन शहा यांचे उपस्थितीत छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथील शानदार कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड झाली. शाळा बाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणे, वीट भट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणे, बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोज्ना राबविणे, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचे पालकत्व देण्यात आले. त्यात ४८०० बालकांचे श्रेणीवर्धन झाले. माझे मुल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याच्या सातबारा तयार केला. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगिण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबविला