सोलापूर : दारू,शिंदी अशा मादक पदार्थांमुळे कित्येक कष्टकरी श्रमिकांच्या घरांची राख रांगोळी झाली ही दाहकता अद्यापही संपलेली नाही.अशातच राज्य सरकार सरकार ला महसूल आणि फळबाग शेतकऱ्यांच्या हितावह असा तर्क लावत किराणा दुकान व मॉल्स मध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा जनता विरोधी निर्णय घेतले.हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे ही मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा माजी नगरसेविका नसीमा शेख, राज्य सचिवा प्राची हातीवेलकर, राज्य उपाध्यक्षा सोन्या गिल,सुनंदा बल्ला, राज्य सहसचिवा रेखा देशपांडे आदींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केले.याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन विक्रीला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले असून याबाबत जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळास आश्वासित केले. अशी माहिती संघटनेच्या राज्यध्यक्षा नसीमा शेख यांनी दिली.
मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय येथे वाईन संदर्भात बैठकीत बोलावण्यात आली होती.या बैठकीला माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेस आमंत्रित करण्यात आले.
यावेळी नरसय्या आडम मास्तर म्हणाले की किराणा दुकान आणि मॉल याठिकाणी जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ उपलब्ध होतात अशा ठिकाणी सर्वसामान्यांचे घर उध्वस्त करणारे दारू अर्थातच वाईन विक्रीला परवानगी मिळाली तर लाखो श्रमिकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतील आणि महिलांवरील अत्याचार आणि अन्याय वाढेल एकंदरीत हा निर्णय जनतेच्या विरोधात असून हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल एवढेच नसून याविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात येईल असे परखड मत व्यक्त केले.

















