
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक
सोलापूर : राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बोलावलेल्या सोलापूरच्या विविध प्रश्नांवर नागपूर येथील रवि भवन येथे आयोजित बैठकीत मोहिते पाटील समर्थक माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे हे आक्रमक दिसून आले. विशेष म्हणजे शहरातील पाणी प्रश्न या बैठकीत चांगलाच गाजला. विस्कळीत पाणी पुरवठा, चार दिवसाआड पाणी पुरवठा यावरून महापालिका अधिकारी धारेवर धरले गेले.
बैठकीला महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे हे ऑनलाइन उपस्थित होते.
शहराचे अध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी गटनेते किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तौफिक शेख, गणेश पुजारी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपायुक्त लोकरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रवीण डोंगरे यांनी पाणी प्रश्नावर अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले, वितरण व्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. महापालिकेला पाण्याची नियोजन करता येत नसतील तर सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावी अशी मागणी केली.
महापालिकेत पत्रकारिता करणाऱ्या नितीन पात्रे, किरण बनसोडे, शिवाजी सुरवसे, चंद्रकांत मिराखोर यांनी ही पाणी पुरवठा विभागावर अधिकाऱ्यांच्या चुका समोर आणल्या. तत्कालीन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांच्या काळात दोन दिवसाआड पाणी पुरवठा झाला होता. त्या अधिकाऱ्याला पुन्हा महापालिकेत येऊ दिले जात नाही. त्यांच्याकडून पाणी पुरवठा आराखडा घ्यावा अन् पाणी वितरण व्यवस्था ही एमजीपीकडे द्यावा अशी मागणी सुद्धा मोदीने केली.
सोलापूरचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी शासन तुमच्या सोबत आहे असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याचे सांगत
आनंद चंदनशिवे यांनी शहराच्या प्रश्नावर ही बैठक आयोजित केली त्याबद्दल अण्णा बनसोडे यांचे आभार मानले. पाणी पुरवठ्यावर नाराजी व्यक्त करताना रात्रीचा पाणी पुरवठा बंद करा, पाण्याच्या वेळी लाईटचे नियोजन करावे.
किसन जाधव यांनी पाणी पुरवठ्याच्या अनेक त्रुटी आहेत, झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात आहे. कामगार वसाहत आहे, त्या भागात पाणी टंचाई आहे. जुन्या जीर्ण लाइन आहेत त्या नव्याने नियोजित करावेत.जुन्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा अशा सूचना केल्या.
तौफिक शेख यांनी पाणी पुरवठा अधिकारी चौबे यांच्या कामाचे कौतुक केले. पण त्यांना अडचणी आहेत. हद्दवाढ भाग असेल किंवा शहर असेल टॅक्स सरसकट वसूल केले जाते. पण तशा सुविधा दिल्या जात नाहीत. पाण्याचे योग्य नियोजन करावे. जो अधिकारी काम करत नसेल तर कारवाई करा अशी मागणी केली.




















