सोलापूर : तिऱ्हे ग्रामपंचायत सरपंच नेताजी सुरवसे, अजय सोनटक्के, गणेश शिंदे, योगीराज पाटील, महेश आसबे, आप्पा कुलकर्णी, प्रदीप सुरवसे, इरफान पठाण या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सोलापूर सांगली चार पदरी रस्ता झाल्याने तिऱ्हे गावावरून ब्रिज केला आहे. मात्र या ब्रिज वरून ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे काही अडचणी प्रशासनाच्या समोर मांडण्यात आल्या. सर्व्हिस रोड तसेच बसस्टॉप जवळ ब्रिज खाऊन बोगदा करण्याची मागणी करण्यात आली.
मौजे-ति- हे गावामध्ये डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला असून या प्रशालेमध्ये ति-हे, पाथरी, शिंगोली, तरटगाव व गावातील व गावाशेजारील वाड्या वस्तीवरील अनेक विद्यार्थी जवळपास 300 ते 350 विद्यार्थी ये-जा करतात या प्रशालेसमोर नेशनल हायवे झाल्याने या रस्त्यावरून वेगाने वाहनाची ये-जा होत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघातास सामोरे जावे लागत आहे.
या ठिकाणी प्रशालेचे मुले-मुली असल्याने त्यांच्या पालकांची वारंवार तक्रार येत आहे त्यामुळे विद्यार्थी घाबरत आहेत म्हणून आपल्या मार्फत सुरक्षेचा विचार करता येथे सर्विस रोड होणे अत्यंत गरजेचे आहे
तिन्हे गावामध्ये बसस्टॉप जवळ येण्यासाठी वयोवृध्द व लहान मुलांना येण्यासाठी रस्ता नसल्याने काही लोक वरुन जाणाऱ्या हायवे रोडवर ये जा करतात त्यामुळे गेल्या आठवड्यात ३ अपघात झाले असून भविष्यात हा रस्ता ओलंडण्यासाठी खूप धोकादायक झाला आहे. सध्या नदीवरील ब्रीज चालू असल्यामुले वाहने सुसाट वेगात जात आहे. आणि तिन्हे येथील नदीकडील बोगदा बसस्टॉप पासून लांब असल्याने लोक वरुन ये जा करतात. त्यामुळे या बसस्टॉपजवळ भूमीगत बोगदा करुन मिळावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

















