सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे २०२१ मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर मार्च २०२० मध्ये निकाल ९०.६६ टक्के लागला होता.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा याशिवाय यंदा निकालात दिव्यांग सर्वाधिक निकाल विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९५.२४ टक्के आहे.सोलापूरातून ३१ हजार ७४५ मुलांनी परिक्षा दिली. यातील २९ हजार ४४५ मुलं पास झाली, तर २२ हजार ७३४ मुलींनी परिक्षा दिली, त्यातील २१ हजार ८५० मुली पास झाल्या. एकूण ५४ हजार ४७९ विद्याथ्यांपैकी ५१ हजार २९५ विद्यार्थी पास झाले आहेत विज्ञान विभागाचा निकाल ९८.८३, कला ९०.५७, वाणिज्य ९२.५५ टेक्निकल ८३.३०, तर व्हिओसी ८८.४३ टक्के निकाल लागला आहे.