सोलापूर : औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज शेषराज आवाड या तरुणाची आठ जनांनी लाकडी दांडयाने व रॉडने ठेचून हत्या करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर या गुन्हयातील आरोपींना मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करुन अजन्म जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटुंबियांना तात्काळ आर्थिक शासकिय मदत देण्यात यावी अशी मागणी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष महेश लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष निखिल पवार, रामलिंग बोराडे, विजय रणदिवे,विजय भोसले, प्रथमेश पागुंडा यांच्यासह समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी दोषी आरोपीवर कारवाई करून पीडित कुटुंबीयांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली…..


















