सोलापूर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील व औरंगजेबची प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी करून निषेध करण्यात आला.
1988 पासून महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती की औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याची मागणी होती. राज्य शासन व केंद्राने या मागणीस मंजुरी दिली असताना सुद्धा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी जाणून-बुजून जातीय ते निर्माण होईल या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध करून उपोषण केले आहे.
या उपोषणामध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाची प्रतिमा वागवून उदो उदो करण्यात आले होते. या नीच वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने व खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेचे दहन करून प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, आकाश कदम, राम चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, विजय वाले, तेजस गायकवाड, महेश गिराम, अमोल सलगर, रमेश भंडारी, विजय बिल्लेगुरू, रुपेशकुमार कीरसावळगी, राजेंद्र माने, बबन डिंगणे, रमेश चव्हाण, शिवाजी यमगवळी, संजय मुळे, रवीकिरण फुलारी, विश्वनाथ आमाने, नितीन होणमाने, प्रशांत एक्काड, मुन्ना कटारे, संजय काशिद, नवनाथ देठे इत्यादी उपस्थित होते.

















