सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये योग्य आणि उत्तमरीत्या नियोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वतःच्या सहीचे पत्र पाठवून कौतुक व अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये…..,
पंढरीची वारी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेची ओळख आहे. महाराष्ट्राचे आराधा श्री विठ्ठल आणि रखुमाई यांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. या वारकरी बंधू-भगिनीची बारी सुखकर व्हावी यासाठी आपण आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमवेत उत्तम नियोजन केले. त्यासाठी आपल्या सर्वांचे सांधिक प्रयत्न कारणीभूत ठरले. या यशस्वी नियोजनासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन,
आपल्या या योगदानामुळे यंदाची वारी हो यशस्वीरित्या पार पडली. भविष्यातही आपण असेच उत्तम काम करून महाराष्ट्राच्या प्रशासनाचा गौरव वाढवाल, अशी अपेक्षा करतो.