सोलापूर : माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही मात्र बार्शी तालुक्यातील एका शाळेचा विषय होता. ती फाईल माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल झाली आहे परंतु बाबर हे अध्यापही यावर सही करत नाहीत अशी तक्रार शंभरकर यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी बाबर यांना फोन लावला मात्र फोन स्विच ऑफ होता त्यामुळे जिल्हाधिकारी बाबर यांच्यावर चिडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले .
मागील अनेक दिवसांपासून शिक्षणाधिकारी बाबर हे आपल्या कार्यालयात दिसत नाहीत, नागरिक आपल्या कामासाठी रोज चकरा मारतात मात्र बाबर यांच्या केबिनचा दरवाजा कायम बंद असतो. सध्या बाबर यांच्यासह लिपिक विजय रणदिवे हे सुद्धा अनेक दिवस कार्यालयात दिसून आले नाहीत. विजय रणदिवे यांनाच घेऊनच बाबर मुंबई पुणे दौरे करत असल्याची कुरबुर माध्यमिक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विजय रणदिवे हे अनेक दिवसानंतर कार्यालयात पाहायला मिळाले. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या फायली घेऊन संबंधित लोक त्यांना घेराटा घातल्याचे चित्र आतमध्ये होतं.
आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणावरून शिक्षणाधिकारी बाबर यांच्यावर गैरकारभाराचा आरोप करत तक्रार केली होती. त्याची सुनावणी झालेली आहे या प्रकरणात बाबर हे चांगलेच अडचणीत सापडल्याचे सांगण्यात येते. तसेच अनेक बेकायदेशीर मान्यता दिल्याची प्रकरणे शिक्षण उपसंचालकासमोर असून या प्रकरणांमुळे बाबर हे कारवाईच्या कचाट्यात सापडल्याचेही बोललं जात आहे.