सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील विटे गावातील विनायक बापू पुजारी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. विटे गावांमध्ये जिल्हा परिषद सोलापूर यांच्या जलसंधारण विभागाच्या मार्फत सुमारे 50 लाख निधीचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण काम मंजूर होते. पुजारी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की,
विटे येथील नाला खोलीकरण व रूंदीकरण करणेसाठी भाग २ मधील कामासाठी रक्कम रुपये ९,९९,०१३ /- रूपये भाग क्रमांक ५ मधील • कामासाठी रक्कम रूपये १,९९.११५/- तसेच भाग क्रमांक ६साठी रक्कम रूपये ९,९९,६७०८ – भाग क्रमांक ७साठी रक्कम रूपये ९,९९,९९७/- व भाग क्रमांक ८साठी ९९८४१३/- रूपये इतक्या रकमेचे कामकाज मंजूर झालेले होते व सदरचे कामकाज सदर कार्यालयामार्फत घालून दिलेल्या दिनांक १६/३/२०२१ रोजीच्या जा.क्र जिपसो/लपावि/१/स्था/स्तर / लेखा – ४/३८/२०२० अन्वये आदेश पारीत करून अटी व शर्तीप्रमाणे कामकाज करणेसाठी सदरचे कामकाज युवराज दत्तात्रय कांबळे यांना दिलेले होते.
२. सदरचे कामकाज हे लोकहिताचे व समाजासाठी असून सदर आदेशामध्ये नमुद केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून व दिलेल्या निर्देशनानुसार सदरचे कामकाज करणे अत्यंत आवश्यक होते. सदरचे कामकाज जवळ जवळ ५०,००,०००/- इतक्या रकमेचे आहे. त्यामुळे सदरचे कामकाज ठेकेदारांनी सहा महिन्याचे कालावधीमध्ये पुर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार सदर ठेकेदार युवराज दत्तात्रय कांबळे यांनी सदर नाला खोलीकरण व रूंदीकरणचे कामकाज केलेले असून सदरचे कामकाज हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केलेले आहे. तसेच आपले अटी व शर्तीमध्ये नमुद केलेप्रमाणे खोलीकरण तसेच दोन्ही बाजूस दिलेला अटीप्रमाणे उतारा व दिलेल्या नकाशाप्रमाणे कामकाज करणे अपेक्षीत होते परंतु सदरचे कामकाज हे अतिशय निकृष्ठ व खालच्या पातळीचे झालेले आहे. तसेच सदर कामकाजास मंजूर केलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम सूध्दा खर्च केलेली नाही. याबाबत मी पी.एम. आगावणे यांचेकडे फोन करून त्याबाबत तक्रार देखील अनेकवेळा केलेली होती व सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करणेबाबत विनंती केली होती. परंतु आगावणे साहेब यांनी त्याबाबत कोणतीही पाहणी केली नाही.
३. सदरचे कामकाज ठेकेदार यांनी व्यवस्थीत करणे आवश्यक असताना सदर ठेकेदार युवराज दत्तात्रय कांबळे यांनी पी.एम. आगावणे यांचेशी संगनमत करून सदर कामकाजामध्ये भ्रष्टाचार करून ठरवून दिलेप्रमाणे कामकाज न करता काही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कामकाज केलेले नाही व पुर्णपणे कामकाज न करताही संबंधित खात्यातील सर्व अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीरपणे कोणतेही काम न करता सर्व बिले अदा करून घेतलेली आहेत. सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.


















