“केरु जाधव व एन के क्षीरसागर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळ केवळ 14 एप्रिल ते मिरवणूक होई पर्यंतच काम करते वर्षभर कोणतेही सामाजिक कार्य करत नाही असा थेट आरोप करत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सह वर्षभर समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असे सांगत या मध्यवर्ती महामंडळाची स्थापना केल्याची भूमिका मांडली”.
सोलापर :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरातील जयंती उत्सव मध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख मंडळ सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून सर्व समावेशक मध्यवर्ती महामंडळ स्थापन करण्याबाबत दि. १६/०३/२०२२ रोजी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवती महामंडळ अशा नावाने मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्याच्या निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
तसेच या बैठकीत विश्वस्त कमिटी व उत्सव कमिटी या मध्यवती महामंडळाच्या आचार संहिता सर्व समावेशक अशा विविध मुद्दावर चर्चा झाली या बैठकीमध्ये एकमताने मान्यता देऊन याचबरोबर या बैठकीमध्ये २१ मार्च २०२२ रोजी दुसरी बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे सायं ६ वाजता बैठक झाली. नंतर या झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील सेवानिवृत्त अधिकारी, वकील, डॉक्टर, साहित्यिक, लेखक यांच्या सोबत बैठक झाली.
या बैठकीमध्ये सहभागी किरुन घेऊन सर्व समावेशक अशा पध्दतीची १.) विश्वस्त पदाधिकाऱ्यांची निवड करणे. २) उत्सव पदाधिकारी तयार करणे या दोन्ही कमिटी तयार झाल्यनंतर मध्यवर्ती महामंडळाची पुढील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती कशा पध्दतीने साजरी करणे, विश्वस्त पदाधिकारी व उत्सव कमिटी निवड झाल्यानंतर सोलापूर शहरातील जयंती/मिरवणूक मध्ये सहभागी होणाऱ्या विविध कमिटी माध्यमातून पोलीस प्रशासनच्या व महापालिका अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करुन विश्वस्त पदाधिकारी व कमिटी पदाधिकारी यांची १६ मार्च २०२२ व २१ मार्च २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पुढील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याच्या दृष्टीकोनातून या दोन्ही बैठकीमध्ये असे निर्णय झाले आहेत.
तरी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंडळ रविवार दि. २७/०३/२०२२ रोजी सांय. ५ वाजता ऐतिहासिक नायकोट १ एकर जागेवर उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, एन के क्षीरसागर, मिलिंद प्रक्षाळे, आर के कांबळे, केरु जाधव, शांतीकुमार नागटिळक, बाबा बाबरे, अजित बनसोडे, भागवत सोनवले, नरेंद्र शिंदे, चंद्रकांत सुरवसे, दीपक गवळी, पप्पू गायकवाड, यांच्यासह अनेक विश्वस्त उपस्थित होते.


















