जालना येथे मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता मात्र जालना येथील मिस्टर पोलीस प्रशासनाने या आंदोलन कर्त्यावर अतिशय निर्गुणपणे हल्ला केला यामध्ये मराठा समाजाच्या महिलांनाही मोठ्या प्रमाणात बेदमपणे मारहाण करण्यात आली आहे या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत.
दरम्यान सोलापूर मराठा क्रांतीचे समन्वयक सुनील रसाळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे ते म्हणाले,
शासनाने लक्षात ठेवावे की, या महाराष्ट्रावर जो मुख्यमंत्री राज्य करीत तो फक्त मराठ्याच्या जीवावर करतो. मराठ्यांच्या रक्तामध्ये योद्धा आहे. या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यानंतर मराठ्यांच्याच जीवावर या देशाचा राजकारण झालेले आहे. उद्या ही मराठ्यांची पोर पोटाची खडकी भरण्यासाठी नक्षलवाद्यासारखी रस्त्यावर उतरली तर त्या दोष मराठा समाजाचा नाही. आरक्षणासाठी मराठा पेटून उठलेला आहे उद्या हा मराठा नक्षलवादी झाला तर त्याचा दोष मराठा समाजावर ठेऊ नये. याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील. असा इशारा देतानाच शनिवारी सकाळी 11 वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.