सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पूर्णवेळ अधिकाऱ्याची फार गरज आहे असे सांगतानाच प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार मारुती फडके यांच्या ऐवजी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे देण्याची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलून दाखवली.
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गांभीर्याने विचार करताना या कामाची क्वालिटी अनेक वर्ष टिकावी चार-पाच वर्षातच या कामांच्या दुरुस्त्या निघू नये यावर आमचे लक्ष असून आता, काम वेळेत पूर्ण न करणे, कामेच सुरु न करणाऱ्यांना मला काही मक्तेदारांना काळया यादीत टाकावेच लागेल असा इशारा सीईओ आव्हाळे यांनी दिला आहे.
आंबेडकर चौकातील नेहरू वसतिगृहाच्या भाडे थकीत असलेल्या गाळेधारकांना 15 ऑगस्ट ही शेवटची मुदत देण्यात आली होती परंतु आता यापुढे अजिबात मदत देऊ नये असे सक्त सूचना बांधकाम विभागाला केल्याच्या त्यांनी सांगितले. नेहरू वसतिगृह बीओटी तत्त्वावर चालवण्यात येणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
कुंभारी येथे तीस हजार कामगारांचा घरकुलाचा रे नगर प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी अंगणवाड्या आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा तसेच अंतर्गत रस्ते जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहेत त्यावर सध्या फोकस करण्यात आता आला आहे असेही आव्हाळे यांनी सांगितले.