भाऊंची अपेक्षा होती पण ताईंनी निभावली आपली जबाबदारी ; खंबीर पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे झालेले नुकसान आणि परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना दिलासा देत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. शहरा सोबत ग्रामीण भागात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून हातातोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालकमंत्र्यांनी शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावात जाऊन पाहणी करणे गरजेचे होते पण भाऊंना दुसरा कार्यक्रम असल्याने ते तिकडे गेले. पण खासदार प्रणिती शिंदे मात्र शनिवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले. असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली. तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाने शेतकऱ्याचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, .तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, अरुण पाटील उपस्थित होते.
यावेळी खालील बाधित शेतकरी कृष्णा यादव, सुजाता धावणे, संतोष यादव, हनुमंत धावणे, नानासाहेब राऊत, सुरज यादव, युवराज यादव, विवेकराज धावणे, शिवम धावणे, विष्णू यादव, महेश यादव, स्वाती धावणे, चंद्राहार धुमाळ, तानाजी धावणे, सत्यवान धावणे, आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी बंडू थिटे, दिलीप धावणे, अरुण पाटील, तानाजी शिंदे, दीपक शिरसाट, दिनकर पोटरे, वसंत चव्हाण, लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.