सोलापूर काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतकऱ्यांना ही मदत करा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे ऊस, सोयाबीन, कांदा, सूर्यफूल, उडीद, द्राक्ष व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नदीकाठच्या गावांमधील घरात पाणी शिरल्याने जनतेचे घरगुती साहित्य वाहून गेले असून, नागरिकांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने सोलापूर जिल्हा ‘ओला दुष्काळ’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दर हेक्टर ₹५०,००० मदत तातडीने जाहीर करून ती थेट खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, वीज बिले माफ करावीत आणि नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदत वितरित करावी, तसेच मोहोळ तालुक्यातील वाघोली मंडळात येणाऱ्या गांवांचे देखील तात्काळ पंचनामे करावे तसेच मा. सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर बुट भिरकावणाऱ्यावर देखील कडक कारवाई करून त्याची सनद रद्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अँड. गजेंद्र गौतम खरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी आरीफ पठाण,लक्ष्मण भालेराव, हर्षदीप गायकवाड, संजय गायकवाड, विजय स्वामी सर, सुभाष वाघमारे,हणमंत जावीर, धोंडीबा म्हाडकर,विवेक कन्ना, उमकांत येरवडे,सुभाष कोकरे, शुभम बाबर, सोमलिंग पाटील, आनंद हरगुडे, बिरुदेव कोकरे, देवजी पाटील, राजु मुजावर, अजिंक्य गायकवाड, नितीन होळेकर, बाळासाहेब कांबळे आदी कांग्रेसचे कार्येकर्ते उपस्थित होते .