Friday, May 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फडणवीसांनी नेमलेला गायकवाड आयोग इतर आयोगांहून का ठरला होता सरस?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 January 2024
in political
0
फडणवीसांनी नेमलेला गायकवाड आयोग इतर आयोगांहून का ठरला होता सरस?
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. २० जानेवारीला ते मुंबईच्या दिशेनं कुच करतील. २६ जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. मराठा आरक्षणावरील विविध चर्चांना उधाण आलंय.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेचा डाव रंगला आहे. मराठा आरक्षण लढ्याची सुरुवात झाली ती ८० च्या दशकापासून. माथाडी कामारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून. अनेक वर्षे सातत्याने सुरु असलेला हा लढा दिवसेंदिवस तीव्र होतोय. महायुती सरकार विरुद्ध महाविकास आघाडी नेत्यांनी एकमेकांच्या कार्यकाळावर बोट ठेवायला सुरुवात केलीये. मात्र, कोणत्या सरकारच्या काळात काय पावलं उचलली गेली? आरक्षणासाठी काय प्रयत्न झाले? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न

२००४ चा बापट आयोग

मराठा आरक्षणाच्या मागणीला मोठा इतिहास आहे. मात्र, गांभीर्याने या प्रश्नावर काम सुरु झालं ते २००४ सालीच हे मान्य करावं लागले. कारण, या प्रश्नावर पहिला आयोग स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षण लढ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून बापट आयोगाकडे पाहिलं जातं. राज्य मागासर्वग आयोगाकडून बापट आयोगाकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आला २१ ऑगस्ट २००४ ला. तेव्हा राज्यात आघाडी सरकार होतं. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव पारित करताना झालेल्या मतदानाकडे मराठा आंदोलक शंकेच्या नजरेने पाहतात. मराठा आरक्षणाचे अभ्यासकर्ते यासाठी रावसाहेब कसबे आणि पर्यायाने शरद पवारांकडे बोट दाखवतात. या आयोगाती सदस्य राहिलेल्या एस. जी. देगावकर आणि सी. बी. देशपांडे यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली. डॉ. अनुराधा भोईटे या मतदानाला गैरहजर राहिल्या. नोटीस नसल्याचं सांगत त्यांनी प्रत्यक्ष मतदानाला गैरहजरी दर्शवली. त्यांचं मत मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना हे घडल्याचं बोललं जातं. त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यातील विधीज्ञ या मुद्द्यावर बोट ठेवतात.

पवारांवर टीका का होते?

मराठा आंदोलकांनी अनेकदा पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलं आहे. पवारांनी प्रत्यक्षात मराठा आरक्षणविरोधी भूमिका कधीही घेतली नाही. त्यांची तशी विधानंही नाहीत. मात्र, त्यांचा संबंध बापट आयोगातील एका सदस्याशी जोडला जातो. झालं असं की, लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको अशी भूमिका घेतली. प्रा. डी. के. गोसावी यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचं सांगितलं. तर अध्यक्ष बापट यांनीही क्षेत्रपाहणी आहवाल नाही, लेखी मत नाही असे सांगितले. तांत्रिक कमतरता दर्शवत त्यांनी आरक्षणाला नकार दिला. ओबीसी प्रवर्गात मराठा समजाचा समावेश न्यायिक नसल्याचा ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने ४ व विरोधात २ मते पडली. रावसाहेब कसब्यांची पवारांसोबत असणारी जवळीकता अधोरेखित केली जाते. कसबेंचा समावेश बापट आयोगात झाला. त्यामुळे आयोगानं मराठा आरक्षणाला नकारल्याचं मत मराठा आंदोलक व्यक्त करतात. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पवारांवर आगपाखड केली जाते.

फडणवीसांकडून २५०० पानी प्रतिज्ञापत्र

आघाडी सरकारांनी बापट आयोगापासून १० वर्षे सत्ता भोगली. २०१४ ला राज्यात सत्तांतर झालं. या सत्तांतरासाठी कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा. २०१४ नंतर १० वर्षांनी आघाडी सरकारने यावर पावलं उचलली. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राणे समिती स्थापित करण्यात आली. राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण दिलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आलं. मात्र उच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारलं. आता आरक्षणाचा मुद्दा हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आली. या क्रमात ५डिसेंबर २०१६ ही तारिख महत्त्वाची आहे. फडणवीस सरकारने या दिवशी उच्च न्यायालयासमोर २५०० पानांचं शपथपत्र दाखल केलं. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इतिहासाचे मोठे संदर्भ गोळा करण्यात आले. या शपथपत्रात संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई, अजानदास यांच्या काळातील पुरावे सादर करण्यात आले. शिवाय १८७१ ते १९३१ मधील ब्रिटिश राजवटीचे जनगणनेचे रेकॉर्ड, महात्मा फुले यांच्या लिखाणातील मराठा कुणबी संदर्भ देण्यात आले. शाहु छत्रपतींनी दिलेल्या आरक्षणाचे १९०२ चे गॅझेड नोटिफिकेशन जोडण्यात आले. फडणवीसांना वारंवार मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले जात होते. त्यावर त्यांनी अभ्यास सुरु आहे असं विधान केलं होतं. यामुळं त्यांच्यावर टीका ही झाली होती.

फडणवीसांनी आयोगाचा संपूर्ण वाचून काढला
मराठा समाजाला आरक्षण देताना या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आयोगाची स्थापना. फडणवीसांनी निवृत्त न्यायमुर्ती एस. बी. म्हसे याची नियुक्ती केली. मात्र २०१८ साली त्यांचं निधन झालं. पुढं त्यांच्या जागी एम. जी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगात ९ सदस्य होते. त्यांनी अभ्यासाअंती १५ नोव्हेंबर २०१८ अहवाल सादर केला. तो ५ हजार पानांचा हा अहवाल होता. या आहवालाने अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केली. यासाठी मोठा व्यापक अभ्यास त्यांनी केला होता. याक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुद्र पुर्वी कोण होते पुस्तकातील संदर्भ. सोबतच त्यांची भाषणं व इतर लेख जोडण्यात आले. डॉ. इरावती कर्वे यांचं मराठा समाजाबद्दलचं संशोधनात्मक मत घेण्यात आलं. सोबतच गेल ओम्वेट यांच्या पुस्तकातील संदर्भांचा समावेश करण्यात आला. सोबतच बापट आयोगातील त्रुटी दुर करण्यात आल्या. क्षेत्रपाहणी आयोगातील मुलाखती, विविध कमिशन्सची भूमिका, गोखले इन्स्टिट्यूटचा सर्वे रिपोर्ट, राणे आयोगाचा डेटा, ऊसतोड कामगारांचा अहवाल, शेतकरी आत्महत्या अहवाल, हमाल माथाडी कामगार अहवाल, घरगुती कामगारांचा अहवाल जोडण्यात आला. फडणवीसांनी विधी व न्याय खात्यावर अवलंबून न राहता या अहवालाचं पान आणि पान वाचून काढल्याचं बोललं जातं. अहवालाच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. विधीमंडळात कायदा पारित करुन १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं. शिवाय उच्च न्यायालयातील आव्हानही यशस्वीपणे पेलत हे आरक्षण फडणवीसांनी टिकवून दाखवलं. या अहवालाच्या आधारे ३० नोव्हेंबर २०१८ ला हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला.

मविआ काळात आरक्षण रद्द

राज्याचं मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंकडे असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारलं. कालेलकर आयोग, मंडल आयोगाचे दाखले दिले. या आयोगांनी मराठा समाजाचं मागासलेपण अमान्य केलं होतं. राज्य सरकारचा १९६१ चा देशमुख आयोग, २००१ चा खत्री आयोग, २००८ च्या बापट आयोगाने मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलं. ६० वर्षे तिच परिस्थिती आहे. तर हे सर्व आयोग चुकीचे आहेत असं सांगायला हवं होतं. असं विधान सर्वोच्च न्यायलायने केलं होतं. ६० वर्षे ज्या ज्या आयोगांनी मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलं गेलं. ते आयोग सरकारांनी नाकारायला हवे होते. असा अर्थ यातून काढण्यात येतो. शिवाय गायकवाड आयोगातील परिशिष्टातील काही पाने परिभाषित करुन न्यायालयासमोर सादर केली नाहीत. म्हणून गायकवाड आयोग नाकारला गेल्याचं बोललं जातं. आघाडी सरकारांनी मराठा आरक्षणावर पाणी सोडलं. हा आरोप यामुळं केला जातो.

Tags: Devendra fadnvisGaikwad commissionMaratha reservation
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्षपदी बशीर शेख ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

Next Post

विजय मालक अभिनंदन ! सोलापूर बाजार समिती संचालकांना सहा महिने मुदतवाढ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
विजय मालक अभिनंदन ! सोलापूर बाजार समिती संचालकांना सहा महिने मुदतवाढ

विजय मालक अभिनंदन ! सोलापूर बाजार समिती संचालकांना सहा महिने मुदतवाढ

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980225
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group