सोलापूर : सुमारे 16 ते 18 दरम्यान वयाच्या मुली शहरातून बेपत्ता होत असल्याचे प्रमाण वाढू लागले आहे दर आठवड्याला चार-पाच मुली या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये येत असून मिळून आलेल्या मुलींची माहिती मात्र समोर येत नाही. पुन्हा समवयीन असलेल्या दोन मुली घरातून निघून गेल्या आहेत. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका श्रीनिवास गणप्पा वय 17 वर्ष 8 महिने राहणार सुनील नगर परिसर व राजनंदिनी सचिन चव्हाण वय 17 वर्ष राहणार कुर्बान हुसेन नगर परिसर सोलापूर असे त्या दोन मुलींचे नाव आहे.
रेणुका ही 16 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोणास न सांगता निघून गेली ती अद्याप परत आलीच नाही. तसेच राजनंदिनी ही सुद्धा 16 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता कॉलेजला जाते म्हणून निघून गेली ती दुपारी दोन वाजेपर्यंत परत आली नाही तेव्हा वडिलांनी कॉलेज मध्ये जाऊन चौकशी केली पण शिक्षकांनी तुमची मुलगी आज कॉलेजला आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोघींना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडिलांनी पोलिसात दिली असून या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.