सोलापूर महाविकास आघाडीच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांना सोमवारच्या 11 ऑक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र बंद बाबत शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, अध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महेश कोठे, दिलीप कोल्हे , जुबेर बागवान यांचे समवेत समक्ष भेट घेऊन आवाहन करत शेतकर्यांच्या हत्येच्या निषेधार्थ संबंध राज्यातच नव्हे तर भारतात देखील विरोध दर्शविला जात असून त्याच्या निषेधार्थ उद्या राज्यात देखील कडकडीत बंद पाळण्याचे महाविकास आघाडी सरकारने सांगितले असून सोलापुरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नवी पेठ मधील सर्व व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने बंद ठेवून या महाराष्ट्र बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सोमवारी सोलापुरातील नवी पेठ व्यापारी असोसिएशन, महापालिका मेजर व मिनी गाळेधारक संघटना, श्री शक्ती पुजा व्यापारी असोसिएशन अंतर्गत असलेली आपापली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंद आंदोलनाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
तसेच हॉटेल असोसिएशन सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, चाटीगल्ली कापड व्यापारी संघटना ,इलेक्ट्रीकल व्यापारी संघटना ,भांडी, सराफ असोसिएशन, मधला मारुती, पंचरुढ कापड व्यापारी, मिठाई दुकानदार व्यापारी संघटना, मधला मारुती व्यापारी संघटनेचा महाविकास आघाडीच्या सोलापूर बंदला पाठींबा देत असल्याचे अध्यक्ष राजू राठी, धवल शहा, बाफना चेतन, संजय कंदले, बचुवार, उदय भागवत यांनी जाहीर केले.
लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांड, कॉंग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी यांच्या अटकेच्या व शेतकरी आंदोलन आणि न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे त्याविषयी सोलापूर शहर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवन येथे संपन्न झाली.
यावेळी बोलताना शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथील आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपचा केंद्र सरकारकडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी यांनाही लाजवेल अश्या प्रकारचे असून लखिमपुर खिरी येथे शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारे आहे. या महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत असे आवाहन सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांनी केली आहे.


















