सन 1995 ते सन 2000 या दशकात अकलुज शहरात व तालुक्यात मोहिते पाटील परीवाराला विरोध करणे म्हणजे साक्षात मुत्युच्या जबड्यात उभे राहून काम करणे,असेच होतं.त्या काळी प्रचंड राजकीय धामधूम होती. अकलुज शहरात मोहिते पाटील विरोधकांना दुकानदार दुकानात सहज सुध्दा उभे राहु देत नव्हते.तालुक्यातील व गावातील मोहीते पाटील यांचे निस्सीम भक्त विरोधक लोकांना सभेत शिवीगाळ करत असायचे.गावातील सर्व प्रकारच्या व्यापारी.कार्यकर्ते गावपुढारी यांच्या कडून मोहीते पाटील विरोधकांना वाळीत टाकले जायचे. कोणीही सहजपणे सुध्दा आमच्याशी बोलत नव्हते.इतकी प्रचंड मोहीते पाटलांची दहशत होती.आमच्या कार्यक्रमाच्या बातम्या पत्रकात छापून येणे,हे फक्त कल्पना करण्यासारखे होते. जो तो मोहीते पाटील प्रेमापोटी आमच्या कडे दात ओठ खावुनच बघायचा.मलाही कधीकधी आपण अतिरेकी आहोत का असा विचार मनात यायचा.अशा आणीबाणीच्या काळात वाफेगावातुन काखेत शबनम,अंगात कुर्ता,पायात पायजमा घातलेला,बोलताना हक्काचे बोलून विश्वासाने हाक मारुन अरे राजाभाऊ कार्यक्रम चांगला झाला. जरा माहिती द्या हा शब्द प्रथम करणारे स्व.प्रसाद जोगळेकर आम्हाला भेटले.आणि आमच्या राजकीय जीवनात आम्हाला पहिल्यांदाच समजले बातमी पेपरमध्ये यांच्या मार्फत छापून येते.तीआमच्या राजकीय जिवनात अनेक कटु,चांगले अनुभव आले,असंख्य संकटे आली .दुखःद घटना घडल्या. वादविवाद घडले. प्रसंगी प्रतिकार करताना हाणामारी सुध्दा घडल्या.या सर्व घटना व आमच्या चांगल्या बाजू पेपरमध्ये छापून आम्ही कसे बरोबर आहोत हे जोगळेकरांनी मांडले.तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख स्व.दत्ता आपा वाघमारे, आ.आर जी आपा,अँड सुभाष आणा पाटील, काका मोटे,उत्तम जानकर,दत्ता पवार,आणा कुलकणीँ, नामदेव वाघमारे,नंदकुमार केंगार ही विरोधक म्हणून माळसिरस तालुक्यात राजकीय क्षेत्रात उभे करण्यासाठी आपल्या लेखनीतुन पेपरमध्ये परखड सत्य,झुंजार मांडुन राजकीय पटलावर प्रसिद्ध करण्यात जोगळेकर काकांचा सिंहाचा वाटा आहे.जोगळेकर काका कायम झुणका भाकर केंद्रात येऊन आमच्या बरोबर अनेक राजकीय,सामाजिक विषयावर चर्चा करायचे.मार्गदर्शन करायचे आणि आम्ही ज्या विषयावर उभे असु तो विषय काकांचा होऊन जायचा.उपाशी तापाशी,उन्हा तान्हात कोर्टात,कचेरीत, पंचायत समितीत तहसील कार्यालयात कुठे ही जोगळेकर काका आमच्या बरोबर असायचे इतर लोकांच्या कामासाठी ही दिसायचे.सध्याच्या चालू कार्यकाळात माझा मुलगा शेखर भैया यांना सुध्दा मार्गदर्शन करायचे.आणि म्हणायचे शेखरभैया,बापान समाजासाठी आयुष्य असेच घालवले आहे तु आधी स्वतः च कुटुंब,शिक्षण,दुकानदारी बघ नंतर राजकारण,समाजकारण बघ.असंख्य गोरगरिबांना ते स्वयंपूर्तीने मदत करायचे.एखादा अडचणीचा विषय असेल तर मला फोन करून राजाभाऊ जरा आँफिसला येता का, असे म्हणायचे आँफिसमध्ये बोलावून तो विषय मला समजावून सांगुन सोडवायचे.चहा पाजायचे.इतकी त्यांना कामाची आवड होती. आयुष्यात फक्त पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी परखड,आणि सत्यच मांडले. कधीही बातमी टाळली नाही. आमच्या बातम्या थोड्याशा वादग्रस्त असल्याने आम्ही काही पत्रकार बांधवांना भेटायचो बातमी दाखवली की ते बांधव म्हणणार राजाभाऊ ही बातमी फक्त जोगळेकरच घेईल.त्यामुळे प्रसाद जोगळेकर काका जाण्याने सर्वात जास्त नुकसान तर आमच्या चळवळीचे आणि गरजु गरीब लोकांचे झाले आहे.काकांना आमच्या बातम्या घ्या म्हणून फोन सुध्दा करावा लागत नसे.बातमी त्यांच्या वॉटसप वर सोडली की बिनधास्त सकाळी सुराज्य उघडायचा.अलिकडे जनमत ला बातमी असायचीच,इतका विश्वास होता.जाहिराती साठी कुठे ही कुणाच्या पुढे मागे करताना काका आम्हाला दिसले नाहीत.आणि मलाही कधी त्यांनी जाहीराती साठी गळ घातली नाही.असा पत्रकार पुन्हा होणे नाही.म्हणून म्हणावेसे वाटते काका पुन्हा जन्माला या.आणि आपले अजरा अमर लेख परत लिहा. आमच्या बातम्या घ्या.
स्व प्रसाद जोगळेकर काका आपणास भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राजाभाऊ खिलारे
पश्चिम महाराष्ट्र
अध्यक्ष दलित महासंघ
मो.9423593593


















