मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या अपेक्षेने राज्य अनलॉक होत असल्याची घोषणा केली होती त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण दिसून आले आता शुक्रवार 4 जून पासून राज्य अनलॉक होत असल्याचे घोषित करण्यात आले मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून विजय वडेट्टीवार यांचे महत्त्व कमी करण्यात आले थांबा राज्यात अजून निर्बंध शिथिल केलेले नाहीत या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याने कहानी मे ट्विस्ट असे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे.
…

















