ग्रामीण भागातील १३८ भूमीहीन बेघर लाभाथ्र्यांना घरकुल बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत गावठाण जागेतील प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून दिले असलेबाबत मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगीतले.
तालुका व गाव निहाय लाभार्थी संख्या पुढील प्रमाणे माढा तालुक्यातील घोटी- १५, जामगाव ०२ रोपळे खुर्द. ०१. मानेगाव- ०१, सोनंद. ०६, खैराव ११, निमगाव टें- ०४, उपळाई खु. ०९, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी ०२, सिंदखेड- १, मंगळवेढा तालुक्यातील ढवळस ०२, तळसंगी- १६, लवंगी. ०४, डोणज ०४, नंदूर. ०९, मोहोळ तालुक्यातील आष्टी- २२, सांगोला तालुक्यातील सोनंद- २७, माळशिरस तालुक्यातील निमगाव ०९ असे एकूण १३८ भूमीहीन लाभाथ्र्यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला आहे.
केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबाना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुले बांधण्यासाठी प्रत्येकी रूपये १.२० लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
तथापी या योजनेतील घरकुलास पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळणे पासून वंचीत राहत होते. ही बाब विचारात घेवून मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी मोहिम स्वरूपात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धता करणे अभियान राबवून माहे ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात २१२९ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या २०९० लाभार्थी जागेअभावी वंचीत असल्याचे व त्यांनाही नजीकच्या कालावधीत जागा उपलब्ध करून देवून गरीब लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करणार असलेचे त्यांनी सांगीतले. याकामी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर व सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी हे अविरत काम करत आहेत.