सोलापूर : ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापरा बरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सदर स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई – मेल आय डीसह हा लघुपट Youtub वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने https:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह दि. २० जुलै २०२१ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी http://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/ या लिंकवर माहिती घ्यावी.
या स्पर्धेमधील भाग १ मध्ये हागणदारीमुक्त अधिकचे लघुपट निर्मितीचे विषय १.जैव – विघटनशील कचरा व्यवस्थापन, २.गोबर्धन, ३.प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ४.सांडपाणी व्यवस्थापन ५.मैल गाळ व्यवस्थापन ६.वर्तणूक बदल.यामधील विजेत्या स्पर्धकांना यात प्रथम पारितोषिक रु.१.६०.०००/- द्वितीय पारितोषिक रु.६०.०००/- आणि तृतीय पारितोषिक रु.३०.०००/- असे असणार आहे.भाग २ मध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये लघुपट निर्मितीचे विषय
१.वाळवंट क्षेत्र २.डोंगराळ प्रदेश ३.सागरी किनारपट्टी लागतच प्रदेश ४.मैदानी भाग ५.पूरप्रवण क्षेत्र असून यामधील प्रथम पारितोषिक रु.२.००.०००/- द्वितीय पारितोषिक रु.१.२०.०००/- आणि तृतीय पारितोषिक रु.८०.०००/- असे असणार आहे.प्रत्येक क्षेत्रा करीता प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेमध्ये सहभागासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे १.केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी / सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे.२.संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील सहभाग घेऊ शकतात. ३.लघुपटाचा कालावधी कमीत कमी १ ते ५ मिनिट असावा.४.केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्वीकारले जातील.स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम व अटी च्या अधीन राहून आवेदन अर्ज सादर करावेत.या लघुपट निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन पाणी व स्वच्छता परमेश्वर राऊत यांनी केले आहे.


















